"ती"ला कमी लेखू नका.."
या विषयावर यापूर्वी कधी भाष्य केलं गेलं नाही, अशातला भाग नाही... मात्र तरीदेखील पुन्हा - पुन्हा का या विषयांवर बोललं जातं, लिहिलं जातं, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. लॉकडाऊन झाल्यापासून आपण सर्वजण घरीच आहोत आणि आपल्यातील अनेकांना हे जाणवले की आपण रोज काम करत असतो, आपल्याला आठवड्यात काही सुट्ट्या तरी मिळतात, मात्र आपल्या घरातील स्त्रियांना कधीच सुट्टी मिळत नाही. वर्षाचे बारा महिने रात्रंदिवस ती निस्वार्थपणे कोणताही मोबदला न घेता काबाडकष्ट करत असते. सोशिकपणा तिच्या ठायी ठायी भरलेला असतो, तरीही आपण तिची योग्य ती दखल घेत नसतो. उलट ती आपल्या लेखी दुय्यम असते व आपण तिची सतत उपेक्षाच करतो आणि हे अनादीकालापासून चालू आहे. शिक्षण घेणेअसो किंवा मग नोकरी, व्यवसाय करणे असो. सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांनी फक्त "चूल आणि मूल" सांभाळायचे,असा अलिखित नियमच होता. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अशीच स्थिती होती. त्याकाळी स्त्रियांना शिक्षण घेऊ दिलं जात नसे. अशा पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये एक क्रांतीची ज्योत पेटली, तमाम स्त्रीयांच्या जीवनात उष:काल झाला. सावि...