" बाप रे बाप"....
अगदी शाळेपासूनच... म्हणजे निबंध लिहून आणा असे आपल्याला सांगितले की योगायोगाने का होईना सगळ्यांचा आवडत ऋतु एकच असायचा तो म्हणजे 'पावसाळा'...पण त्यावेळी पाऊस म्हणजे शाळेला सुट्टी आणि घरी राहून धम्माल करायची बसं एवढंच.. पण आता ? खरं तर पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो, तसाच तो मलाही खुप आवडतो.पण यावेळी पावसाने मात्र कमालच म्हणजे अगदी 'आली लहर केला कहर' याचप्रमाणे...उन्हाळ्यात पावसाची वाट बघून बघून पावसाला शिव्या दिल्या की,'पड ना आता पड.. आता का नाही पडत'..वगैरे सगळं आणि त्यानुसार पावसाने ऐकलं आणि सुरुवात झाली ती एवढी की बाप रे! अगदी सलग तीन-चार दिवस तो काही आता जायचं नावच घेत नव्हता, आणि मलाही खुप कंटाळा आला. कारण चार दिवसांपासून सगळीकडे घडणाऱ्या वाईट घटना, पाणी साठलेले, कॉलेज बंद, त्यामुळे कुठे जाण्याची सोय नाही. त्यात मी राहते पालघर ला ..मित्रांच्या म्हणण्यानुसार गावालाच,इथून आधीच ट्रेन कमी, त्यात पावसाने अस थैमान घातले की त्यामुळे आहे नाही त्या पण ट्रेन बंद झाल्या आणि चक्क सलग चार दिवस मी घरीच.. त्यात मी एक गंमत के...