Posts

Showing posts from March, 2022

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

Image
- रामेश्वरी आहेर.   राजकारण आणि महिला हा विषय काही आपल्यासाठी नवीन नाही. कायमचं या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने याबाबत बोलावसं वाटतं आहे. फार पुर्वीपासुन महिला राजकारणात सक्रिय असण्याचे पुरावे आपल्याला इतिहासात आढळुन येतात. महिलांचा केवळ सहभाग नसुन त्यांची निर्णय प्रक्रिया, राजकीय व सामाजिक चेतना प्रफुल्लित करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे.  इसवी सन बाराव्या शतकानंतर राजकारभाराची सुत्रे महिलांच्या हाती गेल्याचे आपण पाहतो. अवघ्या तेराव्या वर्षी लढलेली रझिया, गोंडवाना संस्थानची महाराणी दुर्गावती, १६व्या शतकात चांदबिबी अशा अनेक महिलांची नावे इतिहासात कोरली गेली आहेत. त्यानंतर सतराव्या शतकात प्रत्यक्ष राज्यकारभार न करता राजकारणाला नवी दिशा दाखवणाऱ्या राजमाता जिजाऊ. जिजाऊनंतर ठळकपणे दिसणारे नाव म्हणजे महाराणी ताराबाई. इसवी सन १७६६ ते १७९५ या काळात आपल्या कार्याने झळाळुव उठल्या त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर.  स्वांतत्रोत्तर काळात भारतीय राजकारणात स्त्रीयांचा मोठा सहभाग मिळाला आहे. ज्या समाजातील तळागाळातील स्त्रियांकरिता प्रेरणादायी ठरल्या....